पुणे

तिघांचा जागीच मृ्त्यू ,नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात…

एसएमबीटी हॉस्पिटलजवळ हा अपघात घडला. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे

नाशिक: नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर आज (21 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास  भीषण अपघात झाला.  या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रिक्षा आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घोटी-सिन्नर महामार्गावरील  एसएमबीटी हॉस्पिटलजवळ हा अपघात  घडला. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करत तातडीने रुग्णालयात पोहोचवले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, हे तपासाअंती स्पष्ट होईल. अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा असून, जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांची जागीच मृत्यू झाला. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नाशिक पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल निसर्गचे मालक अनिकेत रामदास कटके आणि कैलास वांढेकर यांच्यावर सात जणांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी हत्याराने जिवघेणा हल्ला करून हॉटेलचे नुकसान केले. तसेच काऊंटर मधून १८,३०० रुपये जबरदस्तीने काढुन घेवून फरार झाले. याबाबत सासवड पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.दरम्यान दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. परंतु त्यांचा हॉटेलवर दरोडा टाकण्याचा मुख्य उद्देश होता. मात्र आरोपींना विरोध केल्यानंतर आरोपींनी मारहाण करून रक्कम लुटून नेली. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button