maharastra

भुजबळांचा जरांगेंवर आरोप,२४ डिसेंबरला माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु, माझं घरही जाळलं

छगन भुजबळ यांनी अधिवेशनात काय काय म्हटलं आहे?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरच्या आता सरसकट मराठा आरक्षण सरकारने द्यावं अशी मागणी केली आहे. ५ डिसेंबरपासून त्यांच्या सभाही सुरु आहेत. तसंच छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा सामनाही पाहण्यास मिळतो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या गोष्टी छगन भुजबळांविषयी बोलून दाखवल्या त्यांचा पुनरुच्चार करत छगन भुजबळ यांनी २४ डिसेंबरला माझ्यावर हल्ला होईल आणि माझंही घर जाळलं जाईल असा आरोप केला आहे.

जरांगे म्हणाले आहेत मी त्याचा (म्हणजे माझा) कार्यक्रमच करतो. आमच्या हातात दंडुके, सरकारला तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळचा कार्यक्रमच करतो. २४ डिसेंबरचा एक मेसेज समाज माध्यमांवर फिरतो आहे. नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फार्म हे पाहण्याची इच्छा ज्यांना आहे त्यांनी नावं कळवावीत असा हा संदेश आहे. माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांची घरं जाळली त्याप्रमाणेच माझंही घर जाळलं जाईल. कुणी यावं अशी माझी अपेक्षा नाही. त्यापुढे जाऊन सांगतो आहे, पोलीस वाढवले आहेत. तेव्हा मी चौकशी केल्यावर कळलं भुजबळांवर गोळी चालवली जाईल. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या मात्र झुंडशाही थांबवा. आज छगन भुजबळ आहे उद्या दुसरं कुणीतरी असेल. तुम्ही कोणीही त्यावर बोलणार नाही का? खऱ्या अर्थाने या प्रश्नाकडे पाहिलं जाणार आहे का? कुणी यावर बोलणार आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.

कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना सरकाकडून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. या मराठा कुटुंबांचा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. त्याला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मराठा आंदोलनादरम्यान, बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, बीडमधली दंगल ही भुजबळांनीच घडवून आणली होती. त्यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटलांच्या आरोपांना उत्तर दिलं. भुजबळ म्हणाले, हे अत्यंत बालिश असे आरोप आहेत. मी बीडला जाऊन इतकी मोठी दंगल करू शकतो का? मुळात मी असं करण्यामागचं कारण काय? तसेच या दंगलप्रकरणी पकडली गेलेली पिस्तुलधारी माणसं मनोज जरांगे यांची आहेत. २४ तास जरांगेंबरोबर राहणारी माणसं बीडच्या जाळपोळप्रकरणी पोलिसांनी पकडली आहेत. छगन भुजबळ म्हणाले, बीडच्या घटनेशी माझा संबंध काय? गेली कित्येक वर्षे मी बीडला गेलो नसेन…आणि तिथे जाऊन मी काय करणार? माझ्याच लोकांची घरं जाळणार का? मी एवढा अमानुष नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button