Uncategorized

बिहारमधील खळबळजनक घटना ,अंदाधुद गोळीबार, जमिनीच्या वादातून शेतातच बाप लेकाला संपवलं;

आज सकाळी ही घटना घडली आहे. बिहारमधील अराहमध्ये जमिनीच्या वादातून बाप लेकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

बिहारमधील अराहमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शेतात पीक काढत असलेल्या कुटुंबावर आरोपींनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर गोळी लागल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. दोन एकर जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बिहारमध्ये अराहमध्ये दोन एकर जमिनीसाठी दोघांची हत्या करण्यात आली आहे. सशस्त्र हल्लेखोरांनी बाप-लेकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृतक त्याच्या कुटुंबीयांसह शेतात गव्हाचे पीक काढत  होते, तेव्हा ही घटना घडली. गावातील दहा-बारा लोक शस्त्रांसह आले. त्यांनी संपूर्ण कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुनीपूर गावात घडली. ६५ वर्षीय रामधर आणि त्यांचा मधला मुलगा मुकेश कुमार सिंग अशी मृतांची नावे आहेत. मृत रामधर याच्यावर याआधी खुनाचा आरोप  होता. दोन महिन्यांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती मिळतेय.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस अधिकारी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी  पोहोचले. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर गावामध्ये वातावरण तणावपूर्ण आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेबाबत सांगितलं जात आहे की, रघुनीपूर गावात रामधर सिंहचा गावातील काही लोकांशी दोन एकर जमिनीवरून वाद सुरू होता. यापूर्वीही या जमिनीवरून खून आणि मारामारीच्या घटना घडल्या होत्या.

(२ एप्रिल) रामधर पत्नी आणि मुलांसह त्यांच्या शेतात गव्हाचे पीक काढत होते. त्यानंतर गावातील दहा बाराजणांचा घोळका तेथे शस्त्रे घेऊन पोहोचला. त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात  केली. गोळीबारानंतर लोक इकडे-तिकडे धावू लागले. यावेळी गुन्हेगारांनी झाडलेली गोळी रामधर आणि त्याचा मधला मुलगा मुकेश कुमारला लागली. यामध्ये रामधरचा जागीच मृत्यू झाला तर मुकेश कुमारला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे.

मृतक व्यक्तीचा मुलगा योगेश कुमार याने सांगितलं की, गावातील काही लोकांसोबत त्यांचा 2 एकर जमिनीवरून वाद सुरू होता. त्यांचं संपूर्ण कुटुंब शेतात गव्हाचे पीक काढत  होतं. यावेळी 10 हून अधिक लोकं शस्त्रांसह आले. त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात वडील रामधर सिंह आणि भाऊ मुकेश कुमार यांचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला  आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस मोहिम राबवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button