गुन्हेगारीपुणे

पत्नीने दिली होती सुपारी, केले होते २० ते २१ वार,अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी.

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीमध्ये दुसरा विवाह करण्याचा विचार करणाऱ्या पतीची सुपारी देऊन पत्नीने जीवघेणा हल्ला घडवला होता. हल्लेखोरांनी मिठाईलाल बरुड यांच्यावर तब्बल २० ते २१ वार केले होते.

पुणे :पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीमध्ये दुसरा विवाह करण्याचा विचार करणाऱ्या पतीची सुपारी देऊन पत्नीने जीवघेणा हल्ला घडवला होता. हल्लेखोरांनी मिठाईलाल बरुड यांच्यावर तब्बल २० ते २१ वार केले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आधीच मिठाईलालची पत्नी रत्ना बरुड, हल्लेखोर अमन पुजारी आणि शिवम दुबे यांना बेड्या ठोकलेल्या आहेत. या गुन्ह्यात आता हत्येचे कलम वाढणार असल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, मिठाईलाल आणि रत्ना बरुड या दाम्पत्याला तब्बल आठ मुली असून पैकी एका मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. मिठाईलालला वंशाचा दिवा हवा असल्याने तो दुसरा विवाह करण्याच्या मनस्थितीमध्ये होता. रत्नाला सर्व मुलीच झाल्याने तो रत्नाचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. मिठाईलाल हा दुसरा विवाह करण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती रत्नाला मिळाली आणि नोव्हेंबर महिन्यात पती मिठाईलाल याला ठार मारायचं असा प्लॅन सुरू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button